Vidhansabha Election : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवार जाहीर!

  95

शिवडी आणि पंढरपूरच्या जागेवर कोणाला दिली संधी?


मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभेत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते आज सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, मनसेने विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी आणि पंढरपूरच्या जागेवर मनसेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.


मनसेने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून (Pandharpur Assembly Constituency) दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवडी विधानसभेत ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.



शिवडी विधानसभेत होणार ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत


शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा निवडून आले आहेत. दोन्ही वेळा अजय चौधरी यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर दुसरीकडे बाळा नांदगावकर शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे यावेळेस नेमकं कोणाचं पारडं जड होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.