Food Poisioning: फूड पॉईझनिंग झाल्यावर काय करावे, घ्या जाणून

Share

मुंबई: जर काहीही खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास , दर अर्ध्या तासाला उलटी-जुलाब, जेवण न पचणे, डोकेदुखी, अधिक थकवा असे वाटत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.

फूड पॉईझनिंग एक प्रकारचे इन्फेक्शन असते जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस पसरू शकते. जेव्हा बॅक्टेरिया अथवा फंगसने संक्रमण झालेले पदार्थ कोणी खात असेल तर हे बॅक्टेरिया पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मारतात. यामुळे पचनक्रिया बिघडते. खराब पाणी, एक्सपायर झालेले पॅकेज्ड फूड, बराच वेळ बनवून ठेवलेले खाणे खाल्ल्याने त्रास होतो.

३२ ते ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाल्यास बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की ३७ डिग्रीपेक्षा अधिक तापमान बॅक्टेरिया आणि फंगससाठी अनुकूल असते.

याचकारणामुळे अधिक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत जेवण लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ताजे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्य तज्ञांच्या मते जर काहीही खाल्ल्यानंतर पोटात खूप दुखत असेल, दर अर्ध्या तासाला उलटी तसेच जुलाब होत असतील, डोकेदुखी, अधिक थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.

जर काहीही खराब खाल्ल्याने उलटी-जुलाबसोबत ताप, सतत उलटी होणे, उलटीद्वारे शरीरातील पाणी कमी होणे, तोंड सुकत राहणे, शरीरावर रॅशेस येणे अशा प्रकारच्या समस्या तीन दिवसांपेक्षा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

39 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

39 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

47 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

50 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

59 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago