Food Poisioning: फूड पॉईझनिंग झाल्यावर काय करावे, घ्या जाणून

  47

मुंबई: जर काहीही खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास , दर अर्ध्या तासाला उलटी-जुलाब, जेवण न पचणे, डोकेदुखी, अधिक थकवा असे वाटत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


फूड पॉईझनिंग एक प्रकारचे इन्फेक्शन असते जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस पसरू शकते. जेव्हा बॅक्टेरिया अथवा फंगसने संक्रमण झालेले पदार्थ कोणी खात असेल तर हे बॅक्टेरिया पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मारतात. यामुळे पचनक्रिया बिघडते. खराब पाणी, एक्सपायर झालेले पॅकेज्ड फूड, बराच वेळ बनवून ठेवलेले खाणे खाल्ल्याने त्रास होतो.


३२ ते ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाल्यास बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की ३७ डिग्रीपेक्षा अधिक तापमान बॅक्टेरिया आणि फंगससाठी अनुकूल असते.


याचकारणामुळे अधिक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत जेवण लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ताजे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो.


आरोग्य तज्ञांच्या मते जर काहीही खाल्ल्यानंतर पोटात खूप दुखत असेल, दर अर्ध्या तासाला उलटी तसेच जुलाब होत असतील, डोकेदुखी, अधिक थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


जर काहीही खराब खाल्ल्याने उलटी-जुलाबसोबत ताप, सतत उलटी होणे, उलटीद्वारे शरीरातील पाणी कमी होणे, तोंड सुकत राहणे, शरीरावर रॅशेस येणे अशा प्रकारच्या समस्या तीन दिवसांपेक्षा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी