नो बॉलच्या वादाने घेतला चिमुकल्याचा जीव, आईने घडवले माणुसकीचे दर्शन

  42

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दहा वर्षाच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतरही त्याच्या आईने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. महिलेने त्या ११ वर्षाच्या मुलाला माफ केले ज्याच्यामुळे तिच्या काळजाचा तुकडा तिने गमावला होता.


कानपूरमध्ये क्रिकेट खेळत असताना नो बॉलवरून मुलांमध्ये वाद झाला. यावेळेस चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात त्या महिलेच्या मुलाला बॅटने मारले. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला दुसऱ्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे केस दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र तिने असे केले नाही.



खेळात वाद हे होतातच


आरोपी मुलाच्या आईच्या वेदना समजून घेत मृत मुलाच्या आईने आरोपीविरुद्ध रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला. ती म्हणाली खेळताना वादविवाद तर होतातच त्या मुलाने जाणून बुजून माझ्या मुलाला मारले नव्हते.


ही संपूर्ण घटना रविवार सकाळची आहे. जाजमऊ परिसरात केडीए कॉलनीमध्ये राहणारा १० वर्षांचा आरिज आपल्या परिसरातील मित्रांसोबत एकता पार्कमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तो बॉलिंग करत होता तर दुसरा मुलगा बॅटिंग करत होता. यावेळेस नो बॉलवरू त्यांच्यात वाद झाला. यावेळेस बॅटिंग कऱणाऱ्या ११ वर्षाच्या ुलाने आरिजला बॅटने मारले. त्याने इतके जोरात मारले की आरिज बेशुद्ध झाला. आरिजला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले.


Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात