नो बॉलच्या वादाने घेतला चिमुकल्याचा जीव, आईने घडवले माणुसकीचे दर्शन

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दहा वर्षाच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतरही त्याच्या आईने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. महिलेने त्या ११ वर्षाच्या मुलाला माफ केले ज्याच्यामुळे तिच्या काळजाचा तुकडा तिने गमावला होता.


कानपूरमध्ये क्रिकेट खेळत असताना नो बॉलवरून मुलांमध्ये वाद झाला. यावेळेस चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात त्या महिलेच्या मुलाला बॅटने मारले. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला दुसऱ्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे केस दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र तिने असे केले नाही.



खेळात वाद हे होतातच


आरोपी मुलाच्या आईच्या वेदना समजून घेत मृत मुलाच्या आईने आरोपीविरुद्ध रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला. ती म्हणाली खेळताना वादविवाद तर होतातच त्या मुलाने जाणून बुजून माझ्या मुलाला मारले नव्हते.


ही संपूर्ण घटना रविवार सकाळची आहे. जाजमऊ परिसरात केडीए कॉलनीमध्ये राहणारा १० वर्षांचा आरिज आपल्या परिसरातील मित्रांसोबत एकता पार्कमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तो बॉलिंग करत होता तर दुसरा मुलगा बॅटिंग करत होता. यावेळेस नो बॉलवरू त्यांच्यात वाद झाला. यावेळेस बॅटिंग कऱणाऱ्या ११ वर्षाच्या ुलाने आरिजला बॅटने मारले. त्याने इतके जोरात मारले की आरिज बेशुद्ध झाला. आरिजला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले.


Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा