Paris Olympic 2024: लक्ष्य सेन एक दिवस सुवर्णपदक नक्की जिंकेल, सेमीफायनल जिंकणाऱ्या खेळाडूची भविष्यवाणी

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये बॅडमिंटनमध्ये निराशाजनक बातमी समोर आली. पुरूष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेनला पराभव पत्करावा लागला.


लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या व्हिटक्टर एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ असे हरवले. आता लक्ष्य कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे.


पराभवानंतरही लक्ष्य अद्याप पदकाच्या शर्यतीत कायम आहे. आता कांस्यपदकाच्या लढतीत त्याचा सामना मलेशियाच्या ली जी जियाशी ५ ऑगस्टला होणार आहे.


सेमीफायनलमध्ये लक्ष्यने व्हिक्टरला चांगली टक्कर दिली होती. दोन्ही गेम्समध्ये सुरूवातीपासूनच लक्ष्यने मोठी आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी त्याला शेवटपर्यंत टिकवता आली नाही. व्हिक्टरच्या अनुभवी खेळाची या ठिकाणी प्रचिती आली.


या सामन्यानंतर व्हिक्टरने लक्ष्यची तोंडभरून कौतुक केले. तसचे आगामीकाळात एक दिवस लक्ष्य जरूर सुवर्णपदक जिंकेल अशी भविष्यवाणीही केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या व्हिक्टरने म्हटले की मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात एक दिवस तो सुवर्णपदक जरूर जिंकेल.

Comments
Add Comment

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी