IND vs SL: भारताविरूद्धच्या दुसऱ्या वनडेआधी श्रीलंकेला मोठा झटका

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ४ ऑगस्टला रविवारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या आधी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. खरंतर टीमचा स्टार ऑलराऊंडर वानिंदु हसरंगा मालिकेतील दोन्ही सामन्यातून बाहेर झाला आहेस. हसरंगा बाहेर झाल्याने श्रीलंकेसाठी ही समस्या ठरू शकते. हसरंगाच्या जागी जेफरी वांडरसेला संघात सामील करण्यात आले आहे.


हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतील दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हसरंगाच्या या दुखापतीबाबत अपडेट दिले. बोर्डाने लिहिले, वानिंदु हसरंगा वऩडे मालिकेतील बाकीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. कारण त्याला दुखापत झाली आहे. पहिल्या वनडेदरम्यान आपल्या १०व्या षटकातील शेवटचा बॉल फेकताना त्याला दुखापत जाणवली. यानंतर एमआरआय काढल्यानंतर ही दुखापत समोर आली.



पहिल्या वनडेत शानदार कामगिरी


हसरंगाने पहिल्या वनडेत बॉल आणि बॅट दोघांनी योगदान दिले. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्याने ३५ बॉलमध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बॉलिंग करताना १० षटकांत ३ विकेट मिळवल्या होत्या.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच