Health: डायबिटीज आणि बीपी नियंत्रणात ठेवतील हे ५ पदार्थ, वजनही होईल कमी

मुंबई: डायबिटीज, वजन आणि हृदयाचे आरोग्य या तिघांचा संबंध एकमेकांशी आहे. अनेक रिसर्चनुसार डायबिटीज होण्यामागे वाढलेला लठ्ठपणा असतो. लठ्ठपणाचा संबंध हाय बीपी आणि हाय कोलेस्ट्रॉलसोबत असतो. दरम्यान, योग्य डाएट ठेवल्यास या आजारांपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. दरम्यान, आम्ही ५ पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने या आजारांविरोधात तुम्ही लढू शकता.



पालक


पालकाचा समावेश आपल्या डाएटमध्ये जरूर केला पाहिजे. यात व्हिटामिन ई, सी आणि के सोबतच आयर्न, कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. यामुळे बॉडीला भरपूर इम्युनिटी मिळते. सोबतच यात नायट्रेट नावाचे कम्पाऊंड ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते.



बदाम


बदामध्ये योग्य प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. अशातच हृदयासबंधित आजारांचा धोका कमी होतो.



हिरवे मूग


आपल्या डाएटमध्ये मुगाचा समावेश करावा. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.



ओट्स


ओट्समध्ये मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि झिंक आढळते. यात बीटा ग्लुकेन नावाचे सॉल्युबल फायबर असते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी कमी होते.



नाचणी


नाचणीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि फायटोन्यूट्रिएटचा चांगला स्त्रोत आहे. नाचणीमुळे ट्रायग्लिसराईड, एलडीएल, कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि