Health: डायबिटीज आणि बीपी नियंत्रणात ठेवतील हे ५ पदार्थ, वजनही होईल कमी

मुंबई: डायबिटीज, वजन आणि हृदयाचे आरोग्य या तिघांचा संबंध एकमेकांशी आहे. अनेक रिसर्चनुसार डायबिटीज होण्यामागे वाढलेला लठ्ठपणा असतो. लठ्ठपणाचा संबंध हाय बीपी आणि हाय कोलेस्ट्रॉलसोबत असतो. दरम्यान, योग्य डाएट ठेवल्यास या आजारांपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. दरम्यान, आम्ही ५ पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने या आजारांविरोधात तुम्ही लढू शकता.



पालक


पालकाचा समावेश आपल्या डाएटमध्ये जरूर केला पाहिजे. यात व्हिटामिन ई, सी आणि के सोबतच आयर्न, कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. यामुळे बॉडीला भरपूर इम्युनिटी मिळते. सोबतच यात नायट्रेट नावाचे कम्पाऊंड ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते.



बदाम


बदामध्ये योग्य प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. अशातच हृदयासबंधित आजारांचा धोका कमी होतो.



हिरवे मूग


आपल्या डाएटमध्ये मुगाचा समावेश करावा. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.



ओट्स


ओट्समध्ये मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि झिंक आढळते. यात बीटा ग्लुकेन नावाचे सॉल्युबल फायबर असते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी कमी होते.



नाचणी


नाचणीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि फायटोन्यूट्रिएटचा चांगला स्त्रोत आहे. नाचणीमुळे ट्रायग्लिसराईड, एलडीएल, कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी