Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय!

  80

आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिलं


उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर


पुणे : 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत. एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघाडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते. अमित शाह त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. आज त्यांनी भाषण करून हे दाखवून दिलं आहे', असा घणाघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यात केलेल्या टीकेवर आज नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले.


उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपचा राज्यात सत्ता जिहाद सुरू आहे, अमित शाह अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, असं ते म्हणाले. तर फडणवीसांचे नाव न घेता त्यांनी ढेकूण असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे टीका केली. यावर आता फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरील ताबा सुटल्याने निराशेत ते अशा प्रकारे बोलत आहेत, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली.



सचिन वाझेंच्या बाबतीत काय म्हणाले फडणवीस?


सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मी पत्र पाठवले आहे, तसेच माझी नार्को टेस्ट करा असेही त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला त्यांनी पत्र पाठवले हे मी तुमच्या माध्यमातूनच पहिले. अजून मी काही पाहिले नाही. कारण मी दोन दिवस नागपुरात आहे. असे काही आले असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईल. जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय

विलेपार्ले - अंधेरी पूर्व भागांत पुढील शनिवारपर्यंत पाणीकपात

मुंबई : मुंबई मेट्रो-७ अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे अर्थात एमएमआरडीएच्यावतीने,

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

मुंबई : आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४००

MPSC परिक्षांचे फॉर्म भरण्यापूर्वी करावी लागणार खात्री, आयोगाने केला नवा बदल?...

मुंबई : MPSC परीक्षा दरम्यान मोठे घोटाळे होताना अनेक उदाहरणे आयोगासमोर आलेले आहेत. घोटाळ्यांवर आळा आलण्यासाठी

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित 'सहकार से

राज्यातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केल्या सूचना मुंबई : महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने