Tamhini Ghat : मुसळधार पावसाचा ताम्हिणी घाटाला तडाखा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदीचे निर्देश जारी!

पुणे : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) संपूर्ण राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच पुण्यातील ताम्हिणी घाटालाही (Tamhini Ghat) या पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड-पुणे (Raigad- Pune) जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटावरील रस्ता एका बाजूने खचला आहे. यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मार्ग पुढील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवसात याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे सध्या या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदीचे निर्देश जारी केले आहेत.


दरम्यान, रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून उपाययोजनाही करण्यात येत आहेत.



वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद


पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी वरंधा घाट आणि ताम्हिणी घाट असे दोन मार्ग आहेत. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यातच वरंधा घाटात अनेक अरुंद रस्ते व वळणे असल्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Shri Mahalakshmi Temple : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या उपस्थितीत १,४४५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज

Pavanraje Nimbalkar Murder Case : आरोपींची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलांसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज! पंढरपूरसाठी ५,५०० विशेष एसटी बसेस; ४० भाविकांनी मागणी केली तर गावातूनच थेट सेवा

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी

Rajmata Jijau Women's Empowerment Scheme : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार केवळ १ रुपयात जमीन

- महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?