Mhada Lottery : सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईसह कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. अशा घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडावर (Mhada) अवलंबून असतात. त्यामुळे म्हाडाकडून दरवर्षी विविध भागात लॉटरी काढली जाते. त्यानुसार म्हाडा यंदा मुंबईत तब्बल दोन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्याचबरोबर कोकण (Konkan) मंडळासाठीही म्हाडा लॉटरीची तयारी करत आहे. त्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.



मुंबईतील घरांची लॉटरी


मुंबई महामंडळातर्फे काही दिवसांतच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडा गोरेगाव, पवई, विक्रोळी इत्यादी ठिकाणांच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करणार आहे. या घरांच्या किंमती ३४ लाखांपासून सुरू होणार आहेत. तसेच याबाबत अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे.



कोकण महामंडळाची लॉटरी


कोकण महामंडळाकडून लॉटरीची तयारी करण्यात येत आहे. या लॉटरीसंदर्भात कोकण मंडळाकडून लवकरच बैठक घेतली जाणार आहे. सध्या कोकण मंडळाकडे २ हजार घरे उपलब्ध आहेत. पण लवकरच यामध्ये आणखी घरांची वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कोकण मंडळाबरोबरच लवकरच पुणे मंडळाकडूनही लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता म्हाडाच्या लॉटरीकडे लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक