Mhada Lottery : सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईसह कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. अशा घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडावर (Mhada) अवलंबून असतात. त्यामुळे म्हाडाकडून दरवर्षी विविध भागात लॉटरी काढली जाते. त्यानुसार म्हाडा यंदा मुंबईत तब्बल दोन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्याचबरोबर कोकण (Konkan) मंडळासाठीही म्हाडा लॉटरीची तयारी करत आहे. त्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.



मुंबईतील घरांची लॉटरी


मुंबई महामंडळातर्फे काही दिवसांतच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडा गोरेगाव, पवई, विक्रोळी इत्यादी ठिकाणांच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करणार आहे. या घरांच्या किंमती ३४ लाखांपासून सुरू होणार आहेत. तसेच याबाबत अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे.



कोकण महामंडळाची लॉटरी


कोकण महामंडळाकडून लॉटरीची तयारी करण्यात येत आहे. या लॉटरीसंदर्भात कोकण मंडळाकडून लवकरच बैठक घेतली जाणार आहे. सध्या कोकण मंडळाकडे २ हजार घरे उपलब्ध आहेत. पण लवकरच यामध्ये आणखी घरांची वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कोकण मंडळाबरोबरच लवकरच पुणे मंडळाकडूनही लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता म्हाडाच्या लॉटरीकडे लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत