Virar accident : विरारमध्ये भीषण अपघात! कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू

विरार : राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण मोठी समस्या बनत चालली आहे. पुणे आणि वरळीच्या हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही राज्यात ठिकठिकाणी हिट अँड रनच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. त्यातच आता विरारमधूनही (Virar Accident) धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ वर्षीय प्राध्यापिका आत्मजा कासट या गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन त्या जात होत्या. तेवढ्यात मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना गाडीने धडक दिली.


या धडकेमुळे आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. त्यांना कारचालकाने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील या कारचालकाला अटक केली आहे.

Comments
Add Comment

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात

Uday Samant : मुंबईतील अनधिकृत नळजोडण्यांवर ९० दिवसांत होणार मोठी कारवाई

पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारची विशेष मोहीम - मंत्री सामंत मुंबई : मुंबई शहरातील पाणीटंचाई आणि पाणीचोरीच्या

विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्क परतावा बंद

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर; महसुलाचे नुकसान टाळण्यासह तरतुदींचा गैरवापर