Rain: निसर्गाचा प्रकोप! दिल्ली पासून ते केरळपर्यंत पावसाचा कहर, कुठे ढगफुटी तर कुठे भूस्सखलन

नवी दिल्ली: उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे व्हीआयपीसह अनेक भागांमध्ये पाणी भरले. याचा परिणाम अशा झाला की अनेक ठिकाणी जॅम झाल्याची स्थिती निर्माण झाली.


दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबमध्ये पावसामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेतील राज्य केरळमध्ये पावसाने झालेल्या कहरामुळे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाची बैठक बोलावली.



पावसामुळे दिल्ली जलमय


दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे गुरुवारी अनेक रस्त्यांवर पाणी भरले होते. दिल्ली सरकारने पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. जोरदार पावसामुळे शहरातील मोठा भाग जलमय झाला होता. यामुळे नाल्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिल्लीच्या लोकांना घरात राहण्याचे तसेच खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचे सोबतच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते.



ढगफुटीमुळे ५ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता


हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार या घटनेत तब्बल ५० व्यक्ती बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक घर, पूल, रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. हिमाचल प्रदेशात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.



पावसामुळे उत्तर प्रदेशात नद्या तुंडुंब भरल्या


उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातही पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे येथेही अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहे.



राजस्थान-पंजाबमध्येही रस्त्यांवर पाणीच पाणी


राजस्थानात मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे लोकांना गरमीपासून सुटका मिळाली असली तरी ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांतील अनेक ठिकाणी पाणी भरले असून लोकांना याचा त्रास होत आहे. पंजाबमध्येही साधारण असेच चित्र आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत.



वायनाडमध्ये २९१ जणांचा मृत्यू


वायनाडमध्ये झालेल्या भूस्सखलनामध्ये २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाच्या कहराने केरळमधील तीन गावे जमीनदोस्त झाली.

Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी