Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५२ वर्षांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: भारतीय पुरूष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या आपल्या ग्रुप सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३-२ हरवले. २ ऑगस्टला शुक्रवारी खेळवलेल्या सामन्यात भारताकडून अभिषेक आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल केले. तर कांगांरूच्या टीमकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्सने स्कोर केले.


भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिक गेम्समध्ये हरवले. १९७२मध्ये म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवायची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच भारतीयांसाठी कांगारूंविरुद्धचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे. भारतीय संघ आधीच क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला होता.



असा रंगला सामना


या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला. त्यांनी दोन गोल केले. पहिला अभिषेकने फिल्ड गोल केला. हा गोल जबरदस्त झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाला २-० असे पुढे नेले.


दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. थॉमस क्रेगने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ३-१ ने आघाडी मिळवून दिली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि