Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५२ वर्षांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: भारतीय पुरूष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या आपल्या ग्रुप सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३-२ हरवले. २ ऑगस्टला शुक्रवारी खेळवलेल्या सामन्यात भारताकडून अभिषेक आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल केले. तर कांगांरूच्या टीमकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्सने स्कोर केले.


भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिक गेम्समध्ये हरवले. १९७२मध्ये म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवायची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच भारतीयांसाठी कांगारूंविरुद्धचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे. भारतीय संघ आधीच क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला होता.



असा रंगला सामना


या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला. त्यांनी दोन गोल केले. पहिला अभिषेकने फिल्ड गोल केला. हा गोल जबरदस्त झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाला २-० असे पुढे नेले.


दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. थॉमस क्रेगने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ३-१ ने आघाडी मिळवून दिली.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण