Wayanad Landslides: वायनाड भूस्सखलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली असण्याची शक्यता

मुंबई: केरळच्या वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्सखलनात येथील चार गाव भुईसपाट झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण मलब्याखाली दबले असण्याची शक्यता आहे.


आतापर्यंत ३ हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे चिखल, डोंगराचे भाग तसेच झाडांचे मोठमोठे भाग पडल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समस्या येत आहेत. चूरलमाला च्या मुंडक्कई दरम्यान जो पूल वाहून गेला होता त्याला सैन्याचे जवान पुन्हा बनवत आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वेग येईल. आज दुपारपर्यंत चूरलमालाला मुंडक्कईला जोडणारा १९० फूट हा पूल बनून तयार होईल.



राहुल गांधी-प्रियंका गांधी वायनाडसाठी रवाना


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्ली येथून वायनाडसाठी रवाना झाले आहेत. ते आपल्या संसदीय क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही आहेत. भूस्सखलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाची ते भेट घेतील. आधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांना आपला कार्यक्रम स्थगित करावा लागला.



चार गावे झाली नष्ट


वायनाडमधील निसर्गाच्या प्रकोपाने साऱ्यांनाच हादरवून सोडले आहे. अनेक घरे मलब्याखाली दबली आहेत. नदीच्या रस्त्यांमध्ये जे कोणी आले ते वाहून गेले. झाडेच्या झाडे उन्मळून पडली. मोठे मोठे दगड नदीद्वारे वाहून आले होते. काही वेळातच अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य