Mhada Project : झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार! २४०००हून अधिक झोपडीधारकांना मिळणार स्वतःचे घर

मुंबई : सरकारकडून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न सरकारकडून पाहण्यात आले आहे. त्यामुळे अनेक एसआरए (SRA) प्रकल्प सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी कामाआड येणाऱ्या अडचणींमुळे पुनर्विकासाची (Redevelopment) कामे रखडली जात आहेत. त्यामुळे अनेक मुंबईतील अनेक झोपडीधारकांचे इमारतीमध्ये स्वत:चे घर असण्याचे स्वप्न अर्धवट राहिली जातात. परंतु आता अशाच झोपडीधारकांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. मुंबईतील वर्षानुवर्ष रखडलेले एसआरए प्रकल्प आता महाडा पूर्ण करणार आहे. त्यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील म्हाडाच्या जमिनीवरील विकासकांनी अर्धवट सोडलेले १७ प्रकल्प आता म्हाडातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या २४ हजाराहून अधिक झोपडीधारकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे. त्याचबरोबर हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर झोपडीधारकांसोबतच म्हाडाला देखील हाउसिंग स्टॉक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ती घरे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.


त्याचबरोबर संबंधित प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडण्यामागची नेमकी कारणे आम्ही आधी समजून घेऊ. तेथील झोपड्यांची संख्या, गार्डन, रस्ता, विविध आरक्षणे आदी बाबींचा अभ्यास करून पुनर्विकासासाठी नेमकी किती जागा उपलब्ध होईल, याचा सर्वप्रथम आढावा घेतला जाईल. तसेच उर्वरित जागेत सर्वसामान्यांसाठी घरे बांधून त्याची लॉटरीद्वारे विक्री करायची की रिकाम्या प्लॉटची थेट विक्री करायची, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.



या भागातील प्रकल्प म्हाडाच्या हाती


मुंबईत म्हाडाच्या जमिनीवरील २९ एसआरए प्रकल्प कित्येक वर्षे रखडली गेली आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून सरकारकडे दबाव टाकण्यात आला. त्यापैकी रखडलेले १७ एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी आता म्हाडाने तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने अभ्यास देखील सुरु केला आहे. गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली, मजास, दहिसर, चेंबूर, कुर्ला या भागांमध्ये हे प्रकल्प आहेत.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून