Kolhapur Rain : पावसाची मुसळधार! कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट

नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा


कोल्हापूर : मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण आठवडाभर पावसाची संततधार (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्यामुळे कोल्हापूरवर आणखी एकदा पूराचे सावट ओढले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या पावसामुळे ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणही १०० टक्के भरल्यामुळे येथील ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यासोबत पंचगंगा नदी देखील धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे या पाणीपातळीत कधीही वाढ होण्याची शक्यता आहे, यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


दरम्यान, कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूरस्थिती अजूनही कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व नागरिक आणखी चिंतेत आले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनंती शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना केली जात आहे.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी