Wayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई: भारतातील केरळ हे पर्यटनाचे सुंदर ठिकाण. देश-विदेशातील पर्यटक येथील स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र निसर्गाचा कहर झाला आणि त्याचे भयंकर परिणाम केरळमध्ये पाहायला मिळाले. अशी ही दुर्घटना केरळमध्ये पहिल्यांदाच घडली असावी. कालपर्यंत जिथे हिरवळ पसरली होते तेथे आता केवळ मातीचा चिखल, ढिगाऱ्याखाली अडकेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी फोडला जाणारा हंबरडा इतकेच दिसत आहे.


केरळच्या वायनाड जिल्ह्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्सखलनात आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १३१ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९० जण अडकल्याची माहिती मिळत आहे.


घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. दर तासागणिक येथील परिस्थिती त्रासदायक होत आहे. बचावकार्यासाठी जवानांची फौज तैनात आहे. केरळ सरकारकडून दोन दिवसाचा शोक घोषित करण्यात आला आहे. मलब्याखाली अनेकजण दबलेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.


भूस्सखलनामुळे मेप्पडी, मुंडक्कई डाऊन चूरल माला मध्ये शेकडो लोक घरांखाली तसेच मलब्याखाली दबले गेलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य