Wayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई: भारतातील केरळ हे पर्यटनाचे सुंदर ठिकाण. देश-विदेशातील पर्यटक येथील स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र निसर्गाचा कहर झाला आणि त्याचे भयंकर परिणाम केरळमध्ये पाहायला मिळाले. अशी ही दुर्घटना केरळमध्ये पहिल्यांदाच घडली असावी. कालपर्यंत जिथे हिरवळ पसरली होते तेथे आता केवळ मातीचा चिखल, ढिगाऱ्याखाली अडकेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी फोडला जाणारा हंबरडा इतकेच दिसत आहे.


केरळच्या वायनाड जिल्ह्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्सखलनात आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १३१ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९० जण अडकल्याची माहिती मिळत आहे.


घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. दर तासागणिक येथील परिस्थिती त्रासदायक होत आहे. बचावकार्यासाठी जवानांची फौज तैनात आहे. केरळ सरकारकडून दोन दिवसाचा शोक घोषित करण्यात आला आहे. मलब्याखाली अनेकजण दबलेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.


भूस्सखलनामुळे मेप्पडी, मुंडक्कई डाऊन चूरल माला मध्ये शेकडो लोक घरांखाली तसेच मलब्याखाली दबले गेलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना