Fish Price Hike : मासे महागले! मासळी खवय्यांची गटारीला 'तडफड'

  154

जाणून घ्या काय आहेत सध्याचे भाव?


मुंबई : श्रावण (Shravan) महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना येत्या सोमवारपासून म्हणजे ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या या कालावधीत अनेक घरात कटाक्षाने मांसाहार टाळला जातो. त्यामुळे मांसाहार खवय्यांची श्रावण सुरु होण्याआधी केल्या जाणाऱ्या गटारीसंदर्भातील नियोजनांची सुरुवात झाली आहे. मात्र या खवय्यांना यंदाची गटारी मासळी विनाच काढावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सध्या बाजारामध्ये मासळीची आवक कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यासोबत येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असणारी मासळींची मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे मासळीचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आधीच भाज्यांचे दर वाढलेले असतनाच आता मांसाहारही महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.


दरम्यान, १ ऑगस्टपासून बोटी पुन्हा समुद्रात जातील त्यावेळीच सर्वसामान्यांना ताजे मासे स्वस्त दरात मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासाठी किमान १५ दिवसांची तरी वाट पहावी लागणार आहे. परंतु यावेळी श्रावण सुरु असल्याने अनेकांना मास्यांची भूक श्रावणानंतरच शमवता येईल असे चित्र दिसत आहे.



काय आहेत मासळीचे भाव?


मासळीचे भाव वाढण्यापूर्वी सुरमई ४०० रुपयांना विकली जायची. परंतु ती आता चक्क हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबीचे भाव ३८० वरुन ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे पापलेटची किंमत ८०० ते हजार रुपयांवरुन थेट १३०० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे बोंबिलची किंमतही २०० ते २५० रुपयांवरुन ७०० रुपयांवर पोहोचली आहे. तर पाच नग बांगड्यासाठी २०० रुपये मोजावे लागायचे ते आज ३ नगासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वाम ४०० ते ५० रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा आणि रावस यांचे दर ३५० ते ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहचले आहेत.



मासे पुरवठ्यामध्ये समस्या काय?


सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. परंतु हा सर्व आधी साठवून ठेवलेला माल असल्यामुळे सध्या बाजारात मासे महाग आहेत. त्यासोबत ट्रान्सपोर्टेशनदरम्यानही माल खराब होण्याचे प्रमाण बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याचा फटका मास्यांच्या पुरवठ्यावर बसला आहे.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे