Fish Price Hike : मासे महागले! मासळी खवय्यांची गटारीला 'तडफड'

जाणून घ्या काय आहेत सध्याचे भाव?


मुंबई : श्रावण (Shravan) महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना येत्या सोमवारपासून म्हणजे ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या या कालावधीत अनेक घरात कटाक्षाने मांसाहार टाळला जातो. त्यामुळे मांसाहार खवय्यांची श्रावण सुरु होण्याआधी केल्या जाणाऱ्या गटारीसंदर्भातील नियोजनांची सुरुवात झाली आहे. मात्र या खवय्यांना यंदाची गटारी मासळी विनाच काढावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सध्या बाजारामध्ये मासळीची आवक कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यासोबत येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असणारी मासळींची मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे मासळीचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आधीच भाज्यांचे दर वाढलेले असतनाच आता मांसाहारही महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.


दरम्यान, १ ऑगस्टपासून बोटी पुन्हा समुद्रात जातील त्यावेळीच सर्वसामान्यांना ताजे मासे स्वस्त दरात मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासाठी किमान १५ दिवसांची तरी वाट पहावी लागणार आहे. परंतु यावेळी श्रावण सुरु असल्याने अनेकांना मास्यांची भूक श्रावणानंतरच शमवता येईल असे चित्र दिसत आहे.



काय आहेत मासळीचे भाव?


मासळीचे भाव वाढण्यापूर्वी सुरमई ४०० रुपयांना विकली जायची. परंतु ती आता चक्क हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबीचे भाव ३८० वरुन ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे पापलेटची किंमत ८०० ते हजार रुपयांवरुन थेट १३०० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे बोंबिलची किंमतही २०० ते २५० रुपयांवरुन ७०० रुपयांवर पोहोचली आहे. तर पाच नग बांगड्यासाठी २०० रुपये मोजावे लागायचे ते आज ३ नगासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वाम ४०० ते ५० रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा आणि रावस यांचे दर ३५० ते ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहचले आहेत.



मासे पुरवठ्यामध्ये समस्या काय?


सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. परंतु हा सर्व आधी साठवून ठेवलेला माल असल्यामुळे सध्या बाजारात मासे महाग आहेत. त्यासोबत ट्रान्सपोर्टेशनदरम्यानही माल खराब होण्याचे प्रमाण बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याचा फटका मास्यांच्या पुरवठ्यावर बसला आहे.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात