Fish Price Hike : मासे महागले! मासळी खवय्यांची गटारीला 'तडफड'

  130

जाणून घ्या काय आहेत सध्याचे भाव?


मुंबई : श्रावण (Shravan) महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना येत्या सोमवारपासून म्हणजे ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या या कालावधीत अनेक घरात कटाक्षाने मांसाहार टाळला जातो. त्यामुळे मांसाहार खवय्यांची श्रावण सुरु होण्याआधी केल्या जाणाऱ्या गटारीसंदर्भातील नियोजनांची सुरुवात झाली आहे. मात्र या खवय्यांना यंदाची गटारी मासळी विनाच काढावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सध्या बाजारामध्ये मासळीची आवक कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यासोबत येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असणारी मासळींची मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे मासळीचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आधीच भाज्यांचे दर वाढलेले असतनाच आता मांसाहारही महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.


दरम्यान, १ ऑगस्टपासून बोटी पुन्हा समुद्रात जातील त्यावेळीच सर्वसामान्यांना ताजे मासे स्वस्त दरात मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासाठी किमान १५ दिवसांची तरी वाट पहावी लागणार आहे. परंतु यावेळी श्रावण सुरु असल्याने अनेकांना मास्यांची भूक श्रावणानंतरच शमवता येईल असे चित्र दिसत आहे.



काय आहेत मासळीचे भाव?


मासळीचे भाव वाढण्यापूर्वी सुरमई ४०० रुपयांना विकली जायची. परंतु ती आता चक्क हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबीचे भाव ३८० वरुन ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे पापलेटची किंमत ८०० ते हजार रुपयांवरुन थेट १३०० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे बोंबिलची किंमतही २०० ते २५० रुपयांवरुन ७०० रुपयांवर पोहोचली आहे. तर पाच नग बांगड्यासाठी २०० रुपये मोजावे लागायचे ते आज ३ नगासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वाम ४०० ते ५० रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा आणि रावस यांचे दर ३५० ते ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहचले आहेत.



मासे पुरवठ्यामध्ये समस्या काय?


सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. परंतु हा सर्व आधी साठवून ठेवलेला माल असल्यामुळे सध्या बाजारात मासे महाग आहेत. त्यासोबत ट्रान्सपोर्टेशनदरम्यानही माल खराब होण्याचे प्रमाण बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याचा फटका मास्यांच्या पुरवठ्यावर बसला आहे.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी