Raj Thackeray : पुणे पूर परिस्थितीला जबाबदार कोण? : राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत त्यांना आधार दिला. सुमारे ४ तास वेळ देत जाणुन घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांनी ऐकुन घेतल्या. सिंहगड रस्ता भागातील निंबाज नगर ,एकता नगर भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत राजसाहेबांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या नंतर पुलाच्या वाडीत पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुतुबियाना धीर देत राजसाहेबांनी त्यांचे सांत्वन केले.


भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सोमवारीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतरही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यावेळी राज यांनी प्रशासनावर टीका केली.


महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात पाणी सोडणार असल्यास ते अलार्म सिस्टिमद्वारे कळवतात. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. यात झालेल्या अतोनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. या वेळी मनसेचे सर्व महाराष्ट्र राज्य पातळीवरील व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक