मुंबई, ठाण्यात पावसाची उसंत, पाहा राज्यात काय आहे पावसाची स्थिती

  67

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तर पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी तसेच गुरूवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने राज्यातील पुणे, ठाणे, मुंबईमध्ये जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं होतं. गेल्या ४८ तासांत पावसामुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला.


पुण्यात पावसाने कहरच केला. धो धो कोसळणाऱ्या पावसाने पुण्यातील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.यामुळे पुणेकरांचे बेहाल केले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरावाचून काही पर्यायच उरला नाही.


दरम्यान, मुंबईत गुरूवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी ठाणे तसेच मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आळा आहे. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.



पावसाची विश्रांती मात्र लोकलसेवा उशिराने


शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक रेल्वेगाड्या उशिराने सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

मुंबईसाठी गुड न्यूज


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणे विहार, मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तलावही ओसंडून वाहत आहेत

Comments
Add Comment

लोणावळा : भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुंबईत हिरवा झेंडा  मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

Wild Vegetables: पावसामुळे यंदा रानभाज्यांचे लवकर आगमन, ग्राहकांची मागणी

जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात  दिंडोरी:  सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर