मुंबई, ठाण्यात पावसाची उसंत, पाहा राज्यात काय आहे पावसाची स्थिती

  84

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तर पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी तसेच गुरूवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने राज्यातील पुणे, ठाणे, मुंबईमध्ये जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं होतं. गेल्या ४८ तासांत पावसामुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला.


पुण्यात पावसाने कहरच केला. धो धो कोसळणाऱ्या पावसाने पुण्यातील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.यामुळे पुणेकरांचे बेहाल केले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरावाचून काही पर्यायच उरला नाही.


दरम्यान, मुंबईत गुरूवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी ठाणे तसेच मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आळा आहे. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.



पावसाची विश्रांती मात्र लोकलसेवा उशिराने


शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक रेल्वेगाड्या उशिराने सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

मुंबईसाठी गुड न्यूज


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणे विहार, मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तलावही ओसंडून वाहत आहेत

Comments
Add Comment

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या