हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले; पेण तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग


पेण : पेण तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने पेण तालुक्यातील भोगावती नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेटवणे धरण भरल्याने पेण तालुका व नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हेटवणे धरणाची एकूण क्षमता १४७,४९ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.


पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे २ फुटाने उघडले आहेत. दुपारी १ वाजता त्यातून ५५ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने यावर प्रकल्प अधिकारी व सहायक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. धरणाचे दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आले असल्याची माहिती हेटवणे धरणाचे उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे.


या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार व पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा