Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार! रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचे हाल

मुंबई : काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून चांगलाच (Mumbai Rain) जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यात वाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन मानली जाणाऱ्या लोकल (Railway) सेवेवरही पडला आहे. तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत.



तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम


मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.



मुंबईला यलो अलर्ट


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार यासोबत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथे पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन