Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार! रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचे हाल

मुंबई : काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून चांगलाच (Mumbai Rain) जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यात वाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन मानली जाणाऱ्या लोकल (Railway) सेवेवरही पडला आहे. तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत.



तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम


मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.



मुंबईला यलो अलर्ट


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार यासोबत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथे पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य