Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! 'या' तारखेपासून १० टक्के पाणीकपात बंद

मुंबई : महापालिका प्रशासनाने (BMC) ३० मे पासून मुंबईसह इतर शहरांना ५ टक्के पाणीकपात ( Mumbai Water Cut) जारी केला होता. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय लागू केला होता. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीच्या संकटांना (Water Shortage) सामोरे जावे लागत होते. मात्र सध्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईकरांवर असणारे पाणीकपातीचे सावट दूर करण्याबाबत महापालिका निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार महापालिकेने पाणीकपात बंद करण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांतच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई शहराला लागू असलेली १० टक्के पाणीकपात येत्या सोमवारी म्हणजेच २९ जुलैपासून दूर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.



मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ६६. ७७ टक्के इतका झाला आहे. आज सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९,६६,३९५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ६६. ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी हा आकडा ५५.१८ टक्के होता.

Comments
Add Comment

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित

Nashik Housing Scam : नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी

 विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई :

Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्रातील सरकारी भरती प्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले सात महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकूण

North Mumbai Job Fairs : उत्तर मुंबईत दोन मेगा जॉब फेअर, युवकांना रोजगाराच्या मिळणार  संधी 

अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) अंतर्गत मेगा जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद 400 हून अधिक उमेदवारांची

Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने

Asha Bhosle Music Academy : मुंबईत होणार ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश मुंबई : ज्येष्ठ