मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत. सलग पाच सहा दिवस पावसाच्या धारा (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे, सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली आहे. अशातच हवामान विभागाने पुढील पंधरा दिवस मुंबईत पावसाचे थैमान असेच कायम असणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ साली निर्माण झालेल्या मुंबईपूराच्या कटू आठवणी डोळ्यांसमोर येऊन मुंबईकरांची चिंता आणखी वाढू लागली आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज मुंबईमध्ये ६० ते ७० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घ्या कसे असेल मुंबईतील वातावरण.
दरम्यान, हवामान संस्थेने दिलेला अंदाज पाहता मुंबईकरांचा पुढील दोन आठवडे पावसाचा प्रवास करावा लागणार असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान देखील केले आहे.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…