पिकत्या शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी - विनोद म्हात्रे

परवानगी न दिल्यास शेतकरी उग्र आंदोलन करणार


पेण(देवा पेरवी) - भाताचे कोठार म्हणून पेण आणि अलिबाग हे दोन तालुके संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जातात. परंतु आज मितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रा पैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. उर्वरीत लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी (मँग्रोज) अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या वाढलेल्या मँग्रोज मुळे शेतकऱ्याला शेती करणे जीक्रीचे झाले आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने तात्काळ परवानगी द्यावी असे लेखी निवेदन विनोद म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी न दिल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील असाही इशारा दिला आहे.


स्वतःच्या शेतात येणारी खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतक-यांनी हालचाल केल्यास शासकीय अधिकारी उलट शेतक-यांवरच कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उचलत असतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे जर शेतकऱ्यांनी काही करणास्तव एक ते दोन वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनी मध्ये खारपूटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते. या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकऱ्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजमीन पात्र गुन्हा दाखल केला जातो. हे शासनाच धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार अशी मागणीचे लेखी निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांचे नेते विनोद म्हात्रे, विवेक जोशी व सी.आर.म्हात्रे या प्रमुखांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारपूटी (मँग्रोज)ची झाडे वाढली असतील तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी, जर तशी परवानगी शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना दिली नाही तर भुमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील तरुणांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधात उग्र स्वरुपाच आंदोलन करावे लागेल. खारफुटी (मँग्रोज)ची झाडे खारबंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापिक झाली तर त्यांना मूळासकट उपटल्या शिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. यापुढील एक लढा हा पिकत्या शेती वाचवण्यासाठी असेही विनोद म्हात्रे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या २ तरुणांची १० तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात ११२ तरुणांची झाडाझडती

कोल्हापूर : पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या कथित सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क

Gutkha seized in Jalgaon : गुटखा तस्करांना मोठा दणका! जळगाव जामोदमध्ये २२ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक फरार

जळगाव जामोद : प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. मध्य

Chhatrapati Sambhajinagar : डॉन बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर घराची झडती; कोट्यवधींचे घबाड जप्त

छत्रपती संभाजीनगर: ९० च्या दशकात शहरात दहशत आणि दबदबा निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉन 'बाबा फर्जन' याच्या निधनानंतर

Koyana Dam : कोयना धरण ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; १०० टक्के भरण्यासाठी अजून ५२.१२ टीएमसी पाण्याची प्रतीक्षा

कराड: पश्चिम घाटात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कोयना धरणातील पाणी साठ्याच्या वाढीचा वेग मंदावला आहे. तरीही,

Kasara Ghat : कसारा घाटात पावसाचा कहर! संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाला तडे; वाहतूक एकेरी

शहापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहापूर तालुक्यातील जुन्या कसारा घाटाला (Kasara Ghat)

Pune News : व्हायरल व्हिडिओमुळे निलंबन, तपासानंतर बदलला निर्णय; पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम पुन्हा रुजू

पुणे : पुण्यातील डेक्कन (Deccan) परिसरातील चर्चित फ्लाइंग जिप्सी कॅफे (Flying Gypsy Cafe) प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.