पेण(देवा पेरवी) – भाताचे कोठार म्हणून पेण आणि अलिबाग हे दोन तालुके संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जातात. परंतु आज मितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रा पैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. उर्वरीत लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी (मँग्रोज) अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या वाढलेल्या मँग्रोज मुळे शेतकऱ्याला शेती करणे जीक्रीचे झाले आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने तात्काळ परवानगी द्यावी असे लेखी निवेदन विनोद म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी न दिल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील असाही इशारा दिला आहे.
स्वतःच्या शेतात येणारी खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतक-यांनी हालचाल केल्यास शासकीय अधिकारी उलट शेतक-यांवरच कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उचलत असतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे जर शेतकऱ्यांनी काही करणास्तव एक ते दोन वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनी मध्ये खारपूटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते. या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकऱ्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजमीन पात्र गुन्हा दाखल केला जातो. हे शासनाच धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार अशी मागणीचे लेखी निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांचे नेते विनोद म्हात्रे, विवेक जोशी व सी.आर.म्हात्रे या प्रमुखांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारपूटी (मँग्रोज)ची झाडे वाढली असतील तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी, जर तशी परवानगी शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना दिली नाही तर भुमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील तरुणांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधात उग्र स्वरुपाच आंदोलन करावे लागेल. खारफुटी (मँग्रोज)ची झाडे खारबंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापिक झाली तर त्यांना मूळासकट उपटल्या शिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. यापुढील एक लढा हा पिकत्या शेती वाचवण्यासाठी असेही विनोद म्हात्रे यांनी सांगितले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…