पिकत्या शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी - विनोद म्हात्रे

परवानगी न दिल्यास शेतकरी उग्र आंदोलन करणार


पेण(देवा पेरवी) - भाताचे कोठार म्हणून पेण आणि अलिबाग हे दोन तालुके संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जातात. परंतु आज मितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रा पैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. उर्वरीत लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी (मँग्रोज) अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या वाढलेल्या मँग्रोज मुळे शेतकऱ्याला शेती करणे जीक्रीचे झाले आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने तात्काळ परवानगी द्यावी असे लेखी निवेदन विनोद म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी न दिल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील असाही इशारा दिला आहे.


स्वतःच्या शेतात येणारी खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतक-यांनी हालचाल केल्यास शासकीय अधिकारी उलट शेतक-यांवरच कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उचलत असतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे जर शेतकऱ्यांनी काही करणास्तव एक ते दोन वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनी मध्ये खारपूटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते. या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकऱ्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजमीन पात्र गुन्हा दाखल केला जातो. हे शासनाच धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार अशी मागणीचे लेखी निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांचे नेते विनोद म्हात्रे, विवेक जोशी व सी.आर.म्हात्रे या प्रमुखांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारपूटी (मँग्रोज)ची झाडे वाढली असतील तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी, जर तशी परवानगी शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना दिली नाही तर भुमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील तरुणांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधात उग्र स्वरुपाच आंदोलन करावे लागेल. खारफुटी (मँग्रोज)ची झाडे खारबंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापिक झाली तर त्यांना मूळासकट उपटल्या शिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. यापुढील एक लढा हा पिकत्या शेती वाचवण्यासाठी असेही विनोद म्हात्रे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट