Government Job : ईडीच्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी! 'या' पदांची मेगाभरती

मुंबई : भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ईडीने (ED) काही रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे ईडीसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. सातत्याने सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) वाढ होत असल्यामुळे याप्रकरणाला आळा घालण्यासाठी ईडीने ४२ पदांची भरती जारी केली आहे.


ईडीने ४२ कॉम्प्युटर इंजिनियर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये सात सिस्टीम अ‍ॅनालिस्ट तर इतर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ईडीच्या संगणक प्रणालीसोबत काम करता येणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना सिस्टीम अ‍ॅनालिस्ट पदासाठी तब्बल ७० हजार रुपये तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना ५५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.



निवड प्रकिया


इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार, सायबर सिक्युरिटी सॉफ्वेअर, ई-मेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही पदभरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नंतर हे नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंत देखील वाढवण्यात येऊ शकते. सध्या ईडीतील काम हे संवेदनशील असल्याने उमेदवारांना गुप्तता करारावर सही करावी लागणार आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव