Government Job : ईडीच्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी! 'या' पदांची मेगाभरती

मुंबई : भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ईडीने (ED) काही रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे ईडीसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. सातत्याने सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) वाढ होत असल्यामुळे याप्रकरणाला आळा घालण्यासाठी ईडीने ४२ पदांची भरती जारी केली आहे.


ईडीने ४२ कॉम्प्युटर इंजिनियर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये सात सिस्टीम अ‍ॅनालिस्ट तर इतर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ईडीच्या संगणक प्रणालीसोबत काम करता येणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना सिस्टीम अ‍ॅनालिस्ट पदासाठी तब्बल ७० हजार रुपये तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना ५५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.



निवड प्रकिया


इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार, सायबर सिक्युरिटी सॉफ्वेअर, ई-मेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही पदभरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नंतर हे नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंत देखील वाढवण्यात येऊ शकते. सध्या ईडीतील काम हे संवेदनशील असल्याने उमेदवारांना गुप्तता करारावर सही करावी लागणार आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही