Government Job : ईडीच्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी! 'या' पदांची मेगाभरती

मुंबई : भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ईडीने (ED) काही रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे ईडीसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. सातत्याने सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) वाढ होत असल्यामुळे याप्रकरणाला आळा घालण्यासाठी ईडीने ४२ पदांची भरती जारी केली आहे.


ईडीने ४२ कॉम्प्युटर इंजिनियर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये सात सिस्टीम अ‍ॅनालिस्ट तर इतर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ईडीच्या संगणक प्रणालीसोबत काम करता येणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना सिस्टीम अ‍ॅनालिस्ट पदासाठी तब्बल ७० हजार रुपये तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना ५५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.



निवड प्रकिया


इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार, सायबर सिक्युरिटी सॉफ्वेअर, ई-मेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही पदभरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नंतर हे नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंत देखील वाढवण्यात येऊ शकते. सध्या ईडीतील काम हे संवेदनशील असल्याने उमेदवारांना गुप्तता करारावर सही करावी लागणार आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर