Union Budget 2024 : बळीराजासाठी आनंदवार्ता! अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची घोषणा

  111

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नवा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रीत केला असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाबाबत निर्णय घेतला. त्यासोबत महिला व बालकल्याणासाठीही ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत सांगितले. यासोबत बळीराजालाही केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. (Budget For Farmers And Agriculture Sector)


मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा केली. त्यामुळे या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी इतर योजना तयार करण्यात येणार आहेत असे त्यांनी म्हटले.



कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य


कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (Budget) कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केली. यामध्ये १.५२ लाख कोटींची तरतूद केली असून सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील आणणार असून ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )