Union Budget 2024 : बळीराजासाठी आनंदवार्ता! अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची घोषणा

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नवा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रीत केला असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाबाबत निर्णय घेतला. त्यासोबत महिला व बालकल्याणासाठीही ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत सांगितले. यासोबत बळीराजालाही केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. (Budget For Farmers And Agriculture Sector)


मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा केली. त्यामुळे या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी इतर योजना तयार करण्यात येणार आहेत असे त्यांनी म्हटले.



कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य


कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (Budget) कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केली. यामध्ये १.५२ लाख कोटींची तरतूद केली असून सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील आणणार असून ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली