Union Budget 2024 : बळीराजासाठी आनंदवार्ता! अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची घोषणा

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नवा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रीत केला असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाबाबत निर्णय घेतला. त्यासोबत महिला व बालकल्याणासाठीही ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत सांगितले. यासोबत बळीराजालाही केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. (Budget For Farmers And Agriculture Sector)


मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा केली. त्यामुळे या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी इतर योजना तयार करण्यात येणार आहेत असे त्यांनी म्हटले.



कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य


कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (Budget) कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केली. यामध्ये १.५२ लाख कोटींची तरतूद केली असून सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील आणणार असून ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे