Income Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

  79

जुन्या करप्रणालीत नेमका काय बदल झाला?


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे आयकर (Income Tax). प्रत्येकाला आपल्या पगारातून हा कर भरावा लागतो. मात्र, सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या आहेत.


नवीन कर व्यवस्थेनुसार (New tax regime) काही बदल देखील करण्यात आले आहेत. दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचना स्विकारली आहे. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. तर नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर करण्यात आलं आहे.



किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती कर भरावा लागणार?


३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही.
३ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न - ५% कर
७ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न - १०% कर
१० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न - १५% कर
१२ ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न - २०% कर
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - ३०% कर

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )