Income Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

जुन्या करप्रणालीत नेमका काय बदल झाला?


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे आयकर (Income Tax). प्रत्येकाला आपल्या पगारातून हा कर भरावा लागतो. मात्र, सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या आहेत.


नवीन कर व्यवस्थेनुसार (New tax regime) काही बदल देखील करण्यात आले आहेत. दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचना स्विकारली आहे. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. तर नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर करण्यात आलं आहे.



किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती कर भरावा लागणार?


३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही.
३ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न - ५% कर
७ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न - १०% कर
१० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न - १५% कर
१२ ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न - २०% कर
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - ३०% कर

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत