Income Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

जुन्या करप्रणालीत नेमका काय बदल झाला?


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे आयकर (Income Tax). प्रत्येकाला आपल्या पगारातून हा कर भरावा लागतो. मात्र, सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या आहेत.


नवीन कर व्यवस्थेनुसार (New tax regime) काही बदल देखील करण्यात आले आहेत. दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचना स्विकारली आहे. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. तर नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर करण्यात आलं आहे.



किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती कर भरावा लागणार?


३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही.
३ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न - ५% कर
७ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न - १०% कर
१० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न - १५% कर
१२ ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न - २०% कर
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - ३०% कर

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही