Income Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

  81

जुन्या करप्रणालीत नेमका काय बदल झाला?


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे आयकर (Income Tax). प्रत्येकाला आपल्या पगारातून हा कर भरावा लागतो. मात्र, सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या आहेत.


नवीन कर व्यवस्थेनुसार (New tax regime) काही बदल देखील करण्यात आले आहेत. दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचना स्विकारली आहे. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. तर नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर करण्यात आलं आहे.



किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती कर भरावा लागणार?


३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही.
३ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न - ५% कर
७ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न - १०% कर
१० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न - १५% कर
१२ ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न - २०% कर
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - ३०% कर

Comments
Add Comment

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र