MHADA Lottrey : खुशखबर! मुंबईत हक्काच्या घराची होणार स्वप्नपूर्ती


मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती पाहता प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळे म्हाडाची लॉटरी ही अशा नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यातच आता म्हाडा गोरेगावमध्ये आणखी २५०० घरं बांधण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.





गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवा गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर २ हजार ५०० घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत.





पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढणार : म्हाडा





म्हाडाच्या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळानं सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील २ हजार ७०० घरं सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारनं विकासकाकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाकडे सोपवला.





दरम्यान, विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचं काम सुरू केलं आहे. मात्र, ते अर्धवट सोडलं. या अर्धवट घरांसाठीच मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळानं मूळ रहिवाशांच्या ६७२ घरांसह सोडतीतील घरं पूर्ण करण्याचं काम २०२२ मध्ये हाती घेतलं आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. असं असताना देखील मंडळानं आपल्या हिश्श्यातील २ हजार ५०० घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असंही जयस्वाल यांनी सांगितलं आहे.


Comments
Add Comment

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स