MHADA Lottrey : खुशखबर! मुंबईत हक्काच्या घराची होणार स्वप्नपूर्ती


मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती पाहता प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळे म्हाडाची लॉटरी ही अशा नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यातच आता म्हाडा गोरेगावमध्ये आणखी २५०० घरं बांधण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.





गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवा गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर २ हजार ५०० घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत.





पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढणार : म्हाडा





म्हाडाच्या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळानं सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील २ हजार ७०० घरं सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारनं विकासकाकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाकडे सोपवला.





दरम्यान, विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचं काम सुरू केलं आहे. मात्र, ते अर्धवट सोडलं. या अर्धवट घरांसाठीच मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळानं मूळ रहिवाशांच्या ६७२ घरांसह सोडतीतील घरं पूर्ण करण्याचं काम २०२२ मध्ये हाती घेतलं आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. असं असताना देखील मंडळानं आपल्या हिश्श्यातील २ हजार ५०० घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असंही जयस्वाल यांनी सांगितलं आहे.


Comments
Add Comment

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोत महिला सुरक्षा रक्षकाची सतर्कता; प्रवाशाकडून गांज्याची ९ पाकिटे जप्त, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट