Kedarnath landslide : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू


डेहराडून : केदारनाथमधून (Kedarnath) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गातील चिरबासाजवळ दरड कोसळली (Landslide). सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. यात तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (SDRF) एक पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.





रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर सकाळी साडेसात वाजता चिरबासा परिसराजवळ हा अपघात घडला जेव्हा डोंगरावरून ढिगारा आणि जड दगड खाली पडू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (वय ३१) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (वय २४) जालना महाराष्ट्र यांचा समावेश आहे.





चिरबासा जोखमीचा मार्ग





गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. चिरबासा हा भूस्खलन होण्यासाठीच ओळखला जातो. पावसामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मलबा, मोठे दगड पडल्याने अपघात होत असतात. मागच्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.





उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक





उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. “अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, मी या संदर्भात सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची देव शक्ती देवो.”, असं मुख्यमंत्र्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे