Asia Cup: भारताची सलग दुसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये एंट्री

  45


मुंबई: भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर यूएईविरुद्ध भारताने ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. ऋचा घोषच्या तुफानी अर्धशतक आणि हरमनप्रीत कौरच्या कर्णधारीला साजेशी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईविरुद्ध ५ बा २०१ धावसंख्या उभारली होती. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा संघ ७ बाद १२३ धावाच करू शकला.





महिला आशिया कपमध्ये भारताने यूएईविरुद्ध रविवारी मोठ्या विजयासह सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरने कठीण वेळेस येता शानदार अर्धशतक ठोकले. यानंतर अखेरीस ऋचा घोषच्या विस्फोटक खेळीने संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. स्मृती मंधानाला या सामन्यात १३ धावा करता आल्या. तर शेफाली वर्माने ३७ धावांचे योगदान दिले. ३ विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ४७ बॉलमध्ये ६६ धावांची खेळी केली.





ऋचा घोषचे तुफान अर्धशतक





सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऋचा घोषने केवळ २६ बॉलमध्ये ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तुफानी अर्धशतक ठोकले. महिला आशिया कपच्या इतिहासात ऋचा टी-२० मध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली विकेटकीपर बनली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत २०० धावांचा स्कोर करत इतिहास रचला.


Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार