Mumbai Rain : मुंबईची पाण्याची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणारं पहिलं धरण ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) हे पहिलं धरण ओव्हरफ्लो झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता धरण पूर्ण भरुन वाहू लागलं. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हे ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारं एक तलाव आहे. गेल्या वर्षी देखील हे तलाव २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास भरुन वाहू लागलं होतं. तर वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ते ओसंडून वाहू लागलं होतं. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतं.


बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.


यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आटत चालली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जून महिन्यातही फार कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावत होती. मात्र, आता जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील