Mumbai Rain : मुंबईची पाण्याची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणारं पहिलं धरण ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) हे पहिलं धरण ओव्हरफ्लो झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता धरण पूर्ण भरुन वाहू लागलं. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हे ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारं एक तलाव आहे. गेल्या वर्षी देखील हे तलाव २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास भरुन वाहू लागलं होतं. तर वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ते ओसंडून वाहू लागलं होतं. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतं.


बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.


यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आटत चालली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जून महिन्यातही फार कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावत होती. मात्र, आता जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत