Mumbai Rain : मुंबईची पाण्याची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणारं पहिलं धरण ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) हे पहिलं धरण ओव्हरफ्लो झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता धरण पूर्ण भरुन वाहू लागलं. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हे ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारं एक तलाव आहे. गेल्या वर्षी देखील हे तलाव २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास भरुन वाहू लागलं होतं. तर वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ते ओसंडून वाहू लागलं होतं. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतं.


बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.


यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आटत चालली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जून महिन्यातही फार कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावत होती. मात्र, आता जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील