UPSC Chairman : मुदतपूर्तीआधीच यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा!

पूजा खेडकर प्रकरणाचा परिणाम?


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आल्या आहेत. त्यांचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत, त्यातच त्यांच्या आईलाही अटक झाली आहे. तर यूपीएसने (UPSC) पूजा खेडकर यांची उमेदवारी का रद्द केली जाऊ नये असा सवाल उपस्थित करत पूजा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्याविरोधात एफआयआरही (FIR) दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवरच आणखी एक मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी मुदतपूर्तीआधीच आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाचा हा परिणाम आहे का, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.


निवडीसाठी UPSC उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा आल्याने भूवया उंचावल्या आहेत. मनोज सोनी, ज्यांनी मे २०२२ मध्ये UPSC चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या कार्यकाळात अजून पाच वर्षे बाकी आहेत. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता, मात्र त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.



कशी आहे मनोज सोनी यांची कारकीर्द?


अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, डॉ. सोनी यांनी २८ जून २०१७ ते १५ मे २०२३ पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ.सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले. १ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि एप्रिल २००५ पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू म्हणून एक टर्म एप्रिल २००८ पर्यंत होते. बडोद्याच्या MSU मध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते.



सोनी यांनी नेमका का दिला राजीनामा?


वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला आहे. अहवालात नमूद केले आहे की डॉ. सोनी यांना गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला