UPSC Chairman : मुदतपूर्तीआधीच यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा!

  108

पूजा खेडकर प्रकरणाचा परिणाम?


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आल्या आहेत. त्यांचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत, त्यातच त्यांच्या आईलाही अटक झाली आहे. तर यूपीएसने (UPSC) पूजा खेडकर यांची उमेदवारी का रद्द केली जाऊ नये असा सवाल उपस्थित करत पूजा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्याविरोधात एफआयआरही (FIR) दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवरच आणखी एक मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी मुदतपूर्तीआधीच आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाचा हा परिणाम आहे का, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.


निवडीसाठी UPSC उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा आल्याने भूवया उंचावल्या आहेत. मनोज सोनी, ज्यांनी मे २०२२ मध्ये UPSC चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या कार्यकाळात अजून पाच वर्षे बाकी आहेत. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता, मात्र त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.



कशी आहे मनोज सोनी यांची कारकीर्द?


अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, डॉ. सोनी यांनी २८ जून २०१७ ते १५ मे २०२३ पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ.सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले. १ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि एप्रिल २००५ पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू म्हणून एक टर्म एप्रिल २००८ पर्यंत होते. बडोद्याच्या MSU मध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते.



सोनी यांनी नेमका का दिला राजीनामा?


वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला आहे. अहवालात नमूद केले आहे की डॉ. सोनी यांना गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके