अलमायटीचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा


वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या हद्दीत अलमायटी ऑटो कंपनी असून या कंपनीने शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम निष्कासित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.


घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या हद्दीत 'अलमायटी ऑटो अल्सिनरी' ही कंपनी आहे. या कंपनीत चारचाकी गाड्यांचे वायफर व त्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीने औद्योगिक बांधकाम करताना शासनाचे नियम व अटींकडे पूर्णता दुर्लक्ष केले आहे. कंपनीने औद्योगिक वाढीव बांधकाम करताना नियमानुसार जमीन औद्योगिक बिनशेती करणे, बांधकाम परवानगी घेणे मंजूर नकाशाप्रमाणे नियम व अटींच्या अधीन राहून काम करणे तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक २०१५. १९ ऑक्टोबर २०२० अन्वये ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी अथवा विस्तार करण्यासाठी ग्रामपंचायतकडून ना-हरकत दाखला घेणे आदी बाबी बंधनकारक असतानाही त्यांनी सदरील नियम व अटींचे पालन न करता अनधिकृत वाढीव बांधकाम करून शासनाचा तसेच ग्रामपंचायतीचा कर बुडवून ग्रामपंचायतीची दिशाभूल करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप निवेदन तक्रारीत ग्रामस्थांनी केला आहे.


शासन निर्णयानुसार औद्योगिक बांधकाम करताना काही टक्के एफआयएस सोडणे बंधनकारक आहे. कंपनीत रुंद रस्ते, पार्किंग, बगीचा यासाठी जागा सोडणे गरजेचे असतानाही कंपनीने रस्त्यावरच क्रेन उभी केली आहे. संपूर्ण कंपनीत रुंद रस्ते नाहीत, त्यामुळे दुदैवाने एखादा अपघात झाल्यास रुग्णवाहिका अग्निशमन दलाचा बंब जागेवर पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे कामगारांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीतीही तक्रारीत व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीनेही कंपनीचे बांधकाम निष्कासित करणेबाबतची संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असून तसा ठरावही ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे याबाबतची तक्रार ग्रामपंचायत घोणसई मेटने २३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी पालघर व सहाय्यक नगर रचना पालघर यांच्याकडे केली असून एवढा प्रदीर्घ काळावधी उलटूनही महसूल प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता याउलट कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केला आहे.


दरम्यान, अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश आपणांकडून संबंधित विभागाला द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे.


आमच्या कंपनीने बिनशेती (एन.ए.) केला असून सदरचे बांधकाम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच केले आहे. सर्व काम नियमानुसार आहे, असे अलमायटी ऑटो अल्सिनरी कंपनीचे व्यवस्थापक, जयेश अमृतकर यांनी सांगितले.


सदर कंपनीचे बांधकाम हे अनधिकृत असून आमच्या कार्यालयाकडून असा कोणताच नकाशा मंजूर नाही. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत, असे नगररचना पालघर विभागाचे सहाय्यक अधिकारी, प्रसाद देवरे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त