कल्याणी किरकीसे सोलापूर यांना आलेला महाराजांचा अनुभव

गजानन महाराज - प्रवीण पांडे, अकोला


मला गजानन महाराजांच्या प्रचितीचे खूप अनुभव आले आहेत. माझ्या आई-वडिलांना तर अनेक अनुभव आले आहेत. माझी सर्व भावंडे आणि आम्ही सर्व मंडळी महाराजांचे भक्त आहोत. माझ्या वडिलांना महाराजांनी साक्षात दर्शन दिले आहे. १९८५ साली माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाले होते व ते पुण्याला रुबी हॉस्पिटलला अ‍ॅडमिट होते. डॉक्टरांनी त्यांना “आपली तब्येत या दुखण्यातून बरी होऊ शकत नाही” असे सांगितले होते. आता जो काय भरावसा ठेवायचा तो देवावरच ठेवावा असे ठरवून त्यानुसार माझी आई त्यांच्या बाजूला बसून नामस्मरण करून महाराजांच्या पोथीचे पारायण करायची.


ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. महाराज समोर दिसले त्यांना. ते माझ्या आईला म्हणाले, “तुला दिसलेत का महाराज?” आई म्हणाली “मला नाही दिसले.” वडिलांनी एका बाजूला बोट दाखविले आणि आईला म्हणाले, “बघ महाराज आलेत. नमस्कार कर.” ज्या दिशेला त्यांनी बोट दाखवलं त्या दिशेला माझ्या आईने नमस्कार केला. त्यानंतर माझे वडील लगेच वारले. त्यानंतर माझी आई शेगावला गेली. वडिलांच्या कपड्याचे गाठोडे सोबत घेऊन गेली होती. बरोबर तिथे ती मंदिरात नामस्मरण करत बसली असताना तिने समर्थांना सांगितलं की, “मला प्रचिती द्या की, माझ्या पतीस तुम्ही जवळ घेतलेले आहे.” तेव्हा त्या मंदिरात कुठून तरी एक कुत्रा आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या गाठोड्यातले कपडे हुंगले व तो निघून गेला.


त्यानंतर माझ्या आईने महाराजांना नमस्कार केला व “याच्यापुढे माझी काही इच्छा राहिली नाही,” असे सांगितले. “तुम्ही सोबत आहात. तुम्ही सोबत राहा. कायम माझ्याजवळ राहा एवढे बोलून तिने महाराजांना नमस्कार घातला. त्यानंतर तो कुत्रा मंदिरात कुठेही तिला नंतर दिसला नाही.


माझ्या दोन्ही मुलींच्या वेळी मी महाराजांच्या पोथीची पारायण केली आणि त्यांनी मला खूप वेळा प्रचिती देऊन रक्षण
केले आहे.


माझ्या दोन्ही मुली एकदम छान आणि एज्युकेटेड आहेत. सगळी त्यांची कृपा आहे. आम्ही सर्वजण श्री महाराजांचे खूप खूप ऋणी आहोत आणि आमच्यावर महाराजांची कृपा अशीच राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा