अतिवृष्टीमुळे आदिवासीवाडीचा रस्ता गेला वाहून !

मुरूड : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरूड ते तक्का आदिवासीवाडी रस्ता वाहून गेल्याने, साधी टू-व्हीलर देखील जाणे अवघड झाले असून, ऐन पावसाळ्यात शेतीच्या कामात शेतकरी व आदिवासी बांधवांना आपल्या दैनंदिन जीवनात त्रास व हाल सोसावे लागत आहेत.


मुरूडच्या अलकापूरी पाण्याच्या टाकीपासून दीड कि. मी. अंतरावर असलेला तक्का आदिवासीवाडी रस्ता आजपावेतो दुर्लक्षित राहिला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात येथील आदिवासी बांधवांना बाजारहाट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपली अवजारे साहित्य शेतात घेऊन जाणे अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणावर पावसाचे ओहोळ जाऊन अक्षरशः वाहून गेल्याने, रस्त्यावरुन पायी चालणे अवघड झाले आहे.शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने व ग्रामपंचायतीने यात लक्ष पुरवून तक्का आदिवासीवाडी रस्ता दुरुस्त करून चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला