अतिवृष्टीमुळे आदिवासीवाडीचा रस्ता गेला वाहून !

मुरूड : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरूड ते तक्का आदिवासीवाडी रस्ता वाहून गेल्याने, साधी टू-व्हीलर देखील जाणे अवघड झाले असून, ऐन पावसाळ्यात शेतीच्या कामात शेतकरी व आदिवासी बांधवांना आपल्या दैनंदिन जीवनात त्रास व हाल सोसावे लागत आहेत.


मुरूडच्या अलकापूरी पाण्याच्या टाकीपासून दीड कि. मी. अंतरावर असलेला तक्का आदिवासीवाडी रस्ता आजपावेतो दुर्लक्षित राहिला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात येथील आदिवासी बांधवांना बाजारहाट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपली अवजारे साहित्य शेतात घेऊन जाणे अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणावर पावसाचे ओहोळ जाऊन अक्षरशः वाहून गेल्याने, रस्त्यावरुन पायी चालणे अवघड झाले आहे.शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने व ग्रामपंचायतीने यात लक्ष पुरवून तक्का आदिवासीवाडी रस्ता दुरुस्त करून चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये