गांधीनगर : काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये (Gujarat) चांदीपुरा नावाच्या व्हायरसने (Chandipura Virus) एन्ट्री केल्याची माहिती मिळत होती. यामुळे सहा जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून चौघांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये चांदीपुराचे थैमान आणखी वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्येत वाढ झाली असून ती २७ वर पोहोचली आहे. सातत्याने वाढत चाललेल्या चांदीपुराचा कहर पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांदीपुरा विषाणूमुळे संसर्गाचे वातावरण निर्माण झाले आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रुग्णांमधील २७ प्रकरणांपैकी २४ गुजरात तर ३ रुग्ण इतर राज्यातून गुजरातमध्ये आली असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा (Health Department) सतर्क झाली असून गुजरातमध्ये ८५०० हून अधिक घरे आणि ४७ हजारांहून अधिक लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील इतर १२ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद प्रकरणे समोर आली आहेत. व्हायरसच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन गुजरातचे आरोग्य मंत्री आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत.
‘चांदीपुरा’ व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.
या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…