Ajay Baraskar : आषाढी एकादशीच्या पहाटे पंढरपुरात अजय बारस्करांच्या गाडीने घेतला पेट!

  120

बारस्करांना दोन दिवसांपासून येत आहेत धमक्या; नेमकी गाडी जळाली की जाळली?


पंढरपूर : अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) पहाटे पंढरपुरात (Pandharpur) अजय बारस्करांच्या गाडीने पेट घेतला. याविषयी बारस्करांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार केली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांची गाडी नेमकी जळली का जाळली असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. पोलिसांनी याचा कसून शोध सुरु केला आहे.


आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ महाराज यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासा साठी उभारलेल्या ६५ एकर येथील भक्तिसागर येथे पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.


यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. यामुळे १ लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलीस आता कार जळालेल्या परिसरात असणाऱ्या सीसी टीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत.



कार जळण्यामागे जरांगे समर्थकांचा हात?


मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे अजय बारस्कर त्यांचे पूर्वीचे सहकारी होते. बारस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपुरात येण्याआधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. पंढरपूरमध्ये ये तुला मारतो जाळतो अशा धमक्या येत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी बारस्कर यांनी सोशल मिडीयावर शेअर केला होता. यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात हा समर्थक बारस्कर यांना शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक