खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू!

महिन्याभरातील दुसरी घटना


भाईंदर : चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे उत्तनच्या येडू कंपाऊंड येथे राहण्यास आलेल्या सहा वर्षीय किरणचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या खड्डयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या पावसाळ्यात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची शहरातील दुसरी घटना आहे.


काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर हा सहा वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत उत्तन येथील येडू कंपाऊंडमध्ये राहण्यास आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेला. किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे, त्याची आई शोध घेत असताना, घराजवळील एका डबक्याजवळ त्याची चप्पल पडल्याचे दिसली. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने, याची माहिती कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डबक्यात शोध घेतला असता, त्यात किरणचा मृतदेह आढळून आला. उत्तन पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल