खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू!

महिन्याभरातील दुसरी घटना


भाईंदर : चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे उत्तनच्या येडू कंपाऊंड येथे राहण्यास आलेल्या सहा वर्षीय किरणचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या खड्डयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या पावसाळ्यात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची शहरातील दुसरी घटना आहे.


काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर हा सहा वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत उत्तन येथील येडू कंपाऊंडमध्ये राहण्यास आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेला. किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे, त्याची आई शोध घेत असताना, घराजवळील एका डबक्याजवळ त्याची चप्पल पडल्याचे दिसली. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने, याची माहिती कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डबक्यात शोध घेतला असता, त्यात किरणचा मृतदेह आढळून आला. उत्तन पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून