खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू!

  48

महिन्याभरातील दुसरी घटना


भाईंदर : चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे उत्तनच्या येडू कंपाऊंड येथे राहण्यास आलेल्या सहा वर्षीय किरणचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या खड्डयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या पावसाळ्यात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची शहरातील दुसरी घटना आहे.


काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर हा सहा वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत उत्तन येथील येडू कंपाऊंडमध्ये राहण्यास आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेला. किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे, त्याची आई शोध घेत असताना, घराजवळील एका डबक्याजवळ त्याची चप्पल पडल्याचे दिसली. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने, याची माहिती कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डबक्यात शोध घेतला असता, त्यात किरणचा मृतदेह आढळून आला. उत्तन पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.

Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले