भाईंदर : चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे उत्तनच्या येडू कंपाऊंड येथे राहण्यास आलेल्या सहा वर्षीय किरणचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या खड्डयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या पावसाळ्यात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची शहरातील दुसरी घटना आहे.
काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर हा सहा वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत उत्तन येथील येडू कंपाऊंडमध्ये राहण्यास आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेला. किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे, त्याची आई शोध घेत असताना, घराजवळील एका डबक्याजवळ त्याची चप्पल पडल्याचे दिसली. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने, याची माहिती कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डबक्यात शोध घेतला असता, त्यात किरणचा मृतदेह आढळून आला. उत्तन पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…