मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण अतिशय हिरवेगार तसेच आल्हाददायक असते. मात्र यादिवसांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या मोसमात अशा काही भाज्या खाऊ नयेत ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार सतावू शकतात. या भाज्यांमध्ये किटाणू तसेच बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतात.
हिरव्या भाज्या जसे पालक, कोबी आणि सलाड सारख्या भाज्या लवकर दूषित होतात. यात किटाणू आणि किडे लवकर वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाऊ नयेत.
पावसाळ्यात मशरूम खाऊ नयेत. मशरूम ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तसेच विषारी पदार्थ वाढू शकतात. यामुळे पोटाच्या समस्या तसेच आजार वाढण्याची शक्यता असते. याऐवजी तुम्ही दुधी भोपळा, तोंडली, भोपळा या भाज्यांचे सेवन करू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांत वांगी खाऊ नयेत. या मोसमात वांग्यामध्ये किडे तसेच बॅक्टेरिया लवकर वाढतात. यामुळे पाचनसंस्था बिघडू शकते.
फ्लावरमध्ये पावसामुळे छोटे छोटे किडे तसेच बॅक्टेरिया होतात. हे धुवून जात नाहीत. तसेच पावसाळ्यात फ्लॉवर खाल्ल्याने पोटात गॅस तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…