Jioच्या या बूस्टर प्लानने रिचार्ज केल्यास ठरणार फायदेशीर

मुंबई: प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने या महिन्याच्या सुरूवातीच्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे युजर्सना मात्र चांगलाच फटका बसला आहे. आता कंपनीने युजर्ससाठी तीन नवे प्रीपेड बूस्टर पॅक लाँच केले आहेत. यात युजर्सला अगदी किफायतशीर किंमतीत ५जी डेटा मिळू शकेल. यात ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांच्या किंमतीच्या प्लानचा समावेश आहे.



५१ रूपयांचा बूस्टर प्लान


कंपनीने ५१ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला कमी पैशात ५ जी डेटासह ३ जीबी ४जी डेटा ऑफर केली आहे. मात्र यासाठी युजरला आपल्या नंबरवर १.५ जीबी डेली डेटाचा १ महिन्याचा प्लान रिचार्ज करणे गरजेचे आहे. यानंतर ५जी डेटासाठी ५१ रूपयांचा रिचार्ज प्लान घेऊ शकतात.



१०१ रूपयांचा बूस्टर प्लान


जिओच्या १०१ रूपयांच्या प्लानचा फायदा उचलण्यासाठी आधी युजर्ला २ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेल्या १.५ जीबी डेटा अथवा १ जीबी डेटा प्लान रिचार्ज करावा लागेल. यानंतर त्यांना १०१ रूपयांच्या बूस्टर प्लानमध्ये मिळणारे फायदे घेऊ शकतील. यात ६ जीबी ४ जी डेटासह अनलिमिटेड डेटा मिळेल.



१५१ रूपयांचा बूस्टर प्लान


ज्या युजर्सला जास्त डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी जिओचा १५१ रूपयांचा बूस्टर प्लान फायदेशीर ठरू शकतो. या प्लानमध्ये ९ जीबी डेटासह अनलिमिटेड ५जीचा फायदाही मिळेल. यासाठी युजरकडे एक ते दोन महिने १ जीबी अथवा १.५ जीबी डेली डेटाचा पॅक असणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९