Fitness: वजन कमी करण्यासाठी कधी करावे वर्कआऊट, जाणून घ्या योग्य वेळ

मुंबई: वजन नियंत्रित करण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहे. अधिकतर लोक सकाळी अथवा संध्याकाळी जिममध्ये जात अथवा घरी एक्सरसाईज करतात. मात्र फार कमी लोकांना वर्कआऊट करण्याची योग्य वेळ माहीत आहे. सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळेस वर्कआऊट केले पाहिजे. ज्यामुळे वजन वेगाने कमी होईल.



वर्कआऊट करण्याची योग्य वेळ


वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरातील फॅट अधिक बर्न होते. यामुळे मेटाबॉलिज्मही चांगला राहतो. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक्सरसाईज केल्याने वजन दुपटीने कमी होते.



सकाळी किती वाजता वर्कआऊट करावे


तज्ञांच्या मते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केला जाणारा व्यायाम चांगला ठरू शकतो. यामुळे संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते. सकाळी एक्सरसाईज केल्याने हॉर्ट रेट वाढतो. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते.



संध्याकाळी व्यायाम करावा की नाही


तज्ञांच्या मते दिवसभर काम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशातच वजन कमी कऱण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर याचा परिणाम चांगला मिळू शकतो. दरम्यान, संध्याकाळी एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले पोट रिकामी असले पाहिजे. यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर