Accident news : विठ्ठलदर्शनाला निघालेल्या भक्तांच्या बसला अपघात! ५ जणांचा मृत्यू

८ जण गंभीर तर २० ते ३० जण किरकोळ जखमी


नवी मुंबई : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस उरल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. विठूनामाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मात्र, यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहे, तर २० ते ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला.


गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून सातत्याने अपघाताच्या चित्रविचित्रघटना समोर येत आहेत. त्यातच आता वारकऱ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून एकूण ५४ वारकरी प्रवास करत होते. डोंबिवलीवरुन हे सर्वजण विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन बस पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला.


वारकऱ्यांच्या बससमोर एक ट्रॅक्टर जात होता. बसवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर बस जाऊन आदळली. पुढे बस अनियंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात