Accident news : विठ्ठलदर्शनाला निघालेल्या भक्तांच्या बसला अपघात! ५ जणांचा मृत्यू

८ जण गंभीर तर २० ते ३० जण किरकोळ जखमी


नवी मुंबई : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस उरल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. विठूनामाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मात्र, यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहे, तर २० ते ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला.


गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून सातत्याने अपघाताच्या चित्रविचित्रघटना समोर येत आहेत. त्यातच आता वारकऱ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून एकूण ५४ वारकरी प्रवास करत होते. डोंबिवलीवरुन हे सर्वजण विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन बस पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला.


वारकऱ्यांच्या बससमोर एक ट्रॅक्टर जात होता. बसवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर बस जाऊन आदळली. पुढे बस अनियंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

Navnath Ban : 'खोटं बोला, रेटून बोला' हाच राऊतांचा पॅटर्न; पुरावे शून्य, केवळ अफवांचा बाजार नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा

"पराभव जवळ दिसताच राऊतांची सकाळची बडबड सुरू!" : नवनाथ बन मुंबई : "मुंबई महानगरपालिकेत उबाठा आणि मनसेचा पराभव आता

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे