जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत ४ जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(Jammu-kashmir) डोडा जिल्ह्यातील एका जंगली क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यांसह ४ जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती मंगळवारी दिली.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान समूहाच्या जवानांनी रात्री साधारण पावणे आठ वाजता सुरक्षा तसेच घेरावबंदी अभियान सुरू केले. यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली.


२० मिनिटांहून अधिक सुरू असलेल्या या गोळीबारात एका अधिकारीसहित चार सैन्याचे जवान आणि एक पोलीस जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात आणले जात होते त्यांची स्थिती गंभीर झाली होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला.


 


या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना काश्मीर टायगर्सने घेतली आहे. डोडामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक स्थानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक हाय अलर्टवर आहेत. १६ आर्मी कोर, ज्यांना व्हाईट नाईट कोर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सांगितले की अतिरिक्त जवानांनी कुमक डोडामध्ये पाठवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे