जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत ४ जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(Jammu-kashmir) डोडा जिल्ह्यातील एका जंगली क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यांसह ४ जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती मंगळवारी दिली.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान समूहाच्या जवानांनी रात्री साधारण पावणे आठ वाजता सुरक्षा तसेच घेरावबंदी अभियान सुरू केले. यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली.


२० मिनिटांहून अधिक सुरू असलेल्या या गोळीबारात एका अधिकारीसहित चार सैन्याचे जवान आणि एक पोलीस जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात आणले जात होते त्यांची स्थिती गंभीर झाली होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला.


 


या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना काश्मीर टायगर्सने घेतली आहे. डोडामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक स्थानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक हाय अलर्टवर आहेत. १६ आर्मी कोर, ज्यांना व्हाईट नाईट कोर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सांगितले की अतिरिक्त जवानांनी कुमक डोडामध्ये पाठवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील