जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत ४ जवान शहीद

  97

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(Jammu-kashmir) डोडा जिल्ह्यातील एका जंगली क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यांसह ४ जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती मंगळवारी दिली.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान समूहाच्या जवानांनी रात्री साधारण पावणे आठ वाजता सुरक्षा तसेच घेरावबंदी अभियान सुरू केले. यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली.


२० मिनिटांहून अधिक सुरू असलेल्या या गोळीबारात एका अधिकारीसहित चार सैन्याचे जवान आणि एक पोलीस जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात आणले जात होते त्यांची स्थिती गंभीर झाली होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला.


 


या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना काश्मीर टायगर्सने घेतली आहे. डोडामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक स्थानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक हाय अलर्टवर आहेत. १६ आर्मी कोर, ज्यांना व्हाईट नाईट कोर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सांगितले की अतिरिक्त जवानांनी कुमक डोडामध्ये पाठवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या