जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत ४ जवान शहीद

  79

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(Jammu-kashmir) डोडा जिल्ह्यातील एका जंगली क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यांसह ४ जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती मंगळवारी दिली.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान समूहाच्या जवानांनी रात्री साधारण पावणे आठ वाजता सुरक्षा तसेच घेरावबंदी अभियान सुरू केले. यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली.


२० मिनिटांहून अधिक सुरू असलेल्या या गोळीबारात एका अधिकारीसहित चार सैन्याचे जवान आणि एक पोलीस जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात आणले जात होते त्यांची स्थिती गंभीर झाली होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला.


 


या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना काश्मीर टायगर्सने घेतली आहे. डोडामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक स्थानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक हाय अलर्टवर आहेत. १६ आर्मी कोर, ज्यांना व्हाईट नाईट कोर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सांगितले की अतिरिक्त जवानांनी कुमक डोडामध्ये पाठवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.