Accident news : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहने एकमेकांवर आदळली!

वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी


नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली असून अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कसारामधून (Kasara) आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) कसारा घाटात ५ वाहने एकमेकांवर विचित्र पद्धतीने आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला असून ११ ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. नवीन कसारा घाटत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. तसेच घाटात धुकं असल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली गेली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.


सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल

Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश     मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण