Accident news : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहने एकमेकांवर आदळली!

वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी


नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली असून अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कसारामधून (Kasara) आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) कसारा घाटात ५ वाहने एकमेकांवर विचित्र पद्धतीने आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला असून ११ ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. नवीन कसारा घाटत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. तसेच घाटात धुकं असल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली गेली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.


सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील