Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाच्या लग्नात आले 'बिन बुलाए मेहमान'

दोघांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika Wedding) यांचा १२ जुलै रोजी शानदार विवाह सोहळा पार पडला. हा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.


दरम्यान या लग्नसोहळ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीजण लग्नातील जेवणासाठी तर काही गंमत म्हणून दुसऱ्यांच्या लग्नात बिन बुलाए मेहमान बनून हजेरी लावतात. असाच प्रकार चक्क अनंत राधिकाच्या लग्नातही घडल्याचे समोर आले आहे. लग्नसोहळ्याला आलेल्या या व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानींच्या बहुचर्चित लग्न सोहळ्यामध्ये युट्युबर (Youtuber) आणि आणखी एकाने निमंत्रण न मिळताही हजेरी लावल्याचे समोर आले आहे. यूट्यूबर व्यंकटेश अलुरी आणि व्यावसायिक (Commercial) लुकमन मोहम्मद शेख या दोघांनी अनंत राधिकाच्या लग्नात अवैधरित्या प्रवेश केला होता. युट्यूबर असलेल्या अलुरीने युट्यूबसाठी कंटेंट जमा करण्यासाठी तर लुकमन मोहम्मद शेखने औत्सुक्यापोटी प्रवेश केला. मात्र या दोघांनाही लग्नसोहळ्याला उपस्थिती लावणे चांगलेच महागात पडले आहे.


या दोघांनाही बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात ट्रेसा पासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या दोघांची पोलीस कडक चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व