Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाच्या लग्नात आले 'बिन बुलाए मेहमान'

  273

दोघांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika Wedding) यांचा १२ जुलै रोजी शानदार विवाह सोहळा पार पडला. हा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.


दरम्यान या लग्नसोहळ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीजण लग्नातील जेवणासाठी तर काही गंमत म्हणून दुसऱ्यांच्या लग्नात बिन बुलाए मेहमान बनून हजेरी लावतात. असाच प्रकार चक्क अनंत राधिकाच्या लग्नातही घडल्याचे समोर आले आहे. लग्नसोहळ्याला आलेल्या या व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानींच्या बहुचर्चित लग्न सोहळ्यामध्ये युट्युबर (Youtuber) आणि आणखी एकाने निमंत्रण न मिळताही हजेरी लावल्याचे समोर आले आहे. यूट्यूबर व्यंकटेश अलुरी आणि व्यावसायिक (Commercial) लुकमन मोहम्मद शेख या दोघांनी अनंत राधिकाच्या लग्नात अवैधरित्या प्रवेश केला होता. युट्यूबर असलेल्या अलुरीने युट्यूबसाठी कंटेंट जमा करण्यासाठी तर लुकमन मोहम्मद शेखने औत्सुक्यापोटी प्रवेश केला. मात्र या दोघांनाही लग्नसोहळ्याला उपस्थिती लावणे चांगलेच महागात पडले आहे.


या दोघांनाही बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात ट्रेसा पासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या दोघांची पोलीस कडक चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.