Mahavikas Aghadi : संजय राऊतांमुळे मविआत पुन्हा एकदा वादाची ठिणगी!

विधानसभेसाठी 'या' दोन जागांवर चर्चेविनाच ठोकला दावा


अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी जागावाटप करताना महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) ठाकरे गटाने (Thackeray Group) चर्चा न करता सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला होता. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये शीतयुद्ध सुरु झाले होते. यावेळेसही विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) वेळी ठाकरे गटाकडून पुन्हा तीच चूक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. संजय राऊत यांनी मविआसोबत चर्चेविनाच श्रीगोंदा आणि अहमदनगर शहरची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मविआमध्ये वादाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी विधानसभेसाठी श्रीगोंदा आणि अहमदनगर शहरच्या जागेवर दावा ठोकला. मात्र महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली नसताना संजय राऊतांनी दोन जागांवर दावा ठोकल्याने मविआमध्ये वाद सुरु होऊ शकतात.


संजय राऊत यांनी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचे भाषणात जाहीर केले आहे. तसेच अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्या ठिकाणी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच आहे त्यासाठी कामाला लागा उमेदवार नंतर ठरवू असा संदेश संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे आता सांगलीप्रमाणे पुन्हा एकदा मविआमध्ये वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा