Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची एन्ट्री! सहा जणांना विषाणूची लागण, चौघांचा मृत्यू

गांधीनगर : पुण्यामध्ये (Pune) सध्या झिका व्हायरसने (Zika Virus) धुमाकूळ घातला असताना गुजरातमध्येही एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. कोरोना (Corona) व्हायरसनंतर गुजरातमध्ये 'चांदीपुरा' (Chandipura Virus) नावाच्या व्हायरसने एन्ट्री केली आहे. यामुळे दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागही (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार चार मुलांना चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यासोबत आणखी दोन मुलांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या मुलांवर उपचार सुरु असून त्यांचे रक्ताचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू केलं आहे.


दरम्यान, हा व्हायरस रोखण्यासाठी आज आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत चाचणीसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



लक्षणे


'चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू Rhabdoviridae कुटुंबातील वेसिक्युलोव्हायरस वंशाचा सदस्य आहे. जे डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.



उपाय


या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला