Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची एन्ट्री! सहा जणांना विषाणूची लागण, चौघांचा मृत्यू

गांधीनगर : पुण्यामध्ये (Pune) सध्या झिका व्हायरसने (Zika Virus) धुमाकूळ घातला असताना गुजरातमध्येही एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. कोरोना (Corona) व्हायरसनंतर गुजरातमध्ये 'चांदीपुरा' (Chandipura Virus) नावाच्या व्हायरसने एन्ट्री केली आहे. यामुळे दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागही (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार चार मुलांना चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यासोबत आणखी दोन मुलांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या मुलांवर उपचार सुरु असून त्यांचे रक्ताचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू केलं आहे.


दरम्यान, हा व्हायरस रोखण्यासाठी आज आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत चाचणीसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



लक्षणे


'चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू Rhabdoviridae कुटुंबातील वेसिक्युलोव्हायरस वंशाचा सदस्य आहे. जे डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.



उपाय


या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात