CM Eknath Shinde : आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिकेमुळे विरोधकांनी बैठकीला येणं टाळलं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला


मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. त्यातच विरोधक केवळ सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 'विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्यामुळे त्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं', असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आरक्षणासंदर्भात १० टक्के आरक्षण इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता दिले आहे. कोर्टाने स्टे दिलेला नाही. जस्टिस शिंदे समिती काम करत आहे. कालच्या बैठकीत अनेक मुद्दे आलेत, त्यावर काम सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.


बारामतीत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आज पंढरपूरमधील तयारीचा आढावा घेणार आहोत. लाखो वारकरी संप्रदायाची आषाढी एकादशीच्या दिवशी गैरसोय नको, म्हणून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देतोय, तसंच टोल माफी यंदा केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.



विशाळगडावरील मोहिमेला लागलं हिंसक वळण


विशाळगडासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. संभाजीराजे यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले आपले ऐश्वर्य आहेत. शासन याबाबत नक्की विचार करत आहे. या गडाबद्दल काही गोष्टी न्यायालयात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.



लोकसभेनंतर मोदींचा पहिला मुंबई दौरा


तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं. १० लाख लोकांना नोकरी मिळेल, हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात झाल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत आम्ही आणखी काम करू आणि जिंकून येऊ, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.



लाडकी बहीण योजनेत कोणताही गोंधळ नाही


लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladki Bahin Yojana) काहीही गोंधळ झालेला नाही. सगळ्या अटी सुटसुटीत केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जुना डाटाबेस वापरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. योजना अगदी सुटसुटीत झालेली आहे, यात कुठलीही गडबड नाही. लाडकी बहिण योजना प्रसिद्ध होईल, याची सर्व तरतूद सरकारने केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील