तुफान पाऊस; जनजीवन विस्कळीत, काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

  159

महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद


महाड : महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून तुफानी पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड तालुक्यातील काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून मांडले नदीचे पाणी वाढल्याने महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या रस्त्याला पर्यायी असणारा मोहोप्रे आचळोली मार्ग हा लांबीचा पडत असल्याने काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून आपली वाहने या पाण्यातून नेत आहे. अशा धाडसात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.


महाड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळ पासून तुफानी पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात महाड तालुक्यात ११५ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १०४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून सायंकाळ पर्यंत हा जोर कायम असून आणखी ४ ते ५ तास पावसाचा जोर असाच कायम राहीला तर महाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.


महाड रायगड मार्गावरील लाडवली पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून या पुलाजवळून काढलेल्या पर्यायी मार्गावरून शुक्रवारी सायंकाळनंतर पाणी जाऊ लागल्याने हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद पडला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मोहोप्रे आचळोली मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु काही वाहनचालक हा लांबचा फेरा वाचवण्यासाठी आपली वाहने लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावरील पाण्यातून नेत आहेत. आज दुपारी अशाच रितीने आपली दुचाकी पाण्यातून नेताना दोघे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आहेत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी