तुफान पाऊस; जनजीवन विस्कळीत, काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

Share

महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद

महाड : महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून तुफानी पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड तालुक्यातील काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून मांडले नदीचे पाणी वाढल्याने महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या रस्त्याला पर्यायी असणारा मोहोप्रे आचळोली मार्ग हा लांबीचा पडत असल्याने काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून आपली वाहने या पाण्यातून नेत आहे. अशा धाडसात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

महाड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळ पासून तुफानी पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात महाड तालुक्यात ११५ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १०४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून सायंकाळ पर्यंत हा जोर कायम असून आणखी ४ ते ५ तास पावसाचा जोर असाच कायम राहीला तर महाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

महाड रायगड मार्गावरील लाडवली पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून या पुलाजवळून काढलेल्या पर्यायी मार्गावरून शुक्रवारी सायंकाळनंतर पाणी जाऊ लागल्याने हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद पडला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मोहोप्रे आचळोली मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु काही वाहनचालक हा लांबचा फेरा वाचवण्यासाठी आपली वाहने लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावरील पाण्यातून नेत आहेत. आज दुपारी अशाच रितीने आपली दुचाकी पाण्यातून नेताना दोघे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आहेत.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

4 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

4 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

5 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

6 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

7 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

7 hours ago